HW News Marathi
राजकारण

एअर स्ट्राइकमुळे लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात भाजपच्या २२ जागा येतील

बंगळुरु | पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेने मंगळवारी (२६ फेब्रुवारी) पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करून मोठी कारवाई केली आहे. यानंतर बिथरलेल्या पाकिस्ताने भारताविरोधात जम्मू-काश्मीरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केली आहे. यामुळे सध्या भारत-पाकिस्तानमध्ये तवाणाचे वातावरण आहे. भारतीय वायुसेनेने केलेल्या कारवाईचा भाजप राजकीय फायदा घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी भारतीय वायुसेनेने केलेल्या कारवाईचा फायदा पक्षाला होईल असे म्हटले आहे. सध्याची परिस्थिती ही भाजपच्या बाजूने असल्याचे दिसत आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईनंतर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनात लाट तयार झाली आहे. या लाटेचा फायदा आगामी लोकसभा निवडणुकीत दिसून येणार असल्याचे येडियुरप्पा यांनी म्हणाले आहे. तसेच या कारवाईमुळे कर्नाटकात येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला २२ हून अधिक जागा जिंकण्यास मदत होईल, असे बी. एस. येडियुरप्पा यांनी सांगितले.

२०१४च्या लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकात एकूण २८ जागांपैकी भाजप १७, काँग्रेस ९ आणि जेडीएस २ अशा जागा मिळाल्या होत्या. परंतु गत वर्षी बेल्लारी मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यामुळे सध्या भाजपकडे १६ जागा आहेत. गुरुवारी (१४ फेब्रुवारी) पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मंगळवारी (२६ फेब्रुवारी) भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करून मोठी कारवाई केली. या कारवाईत भारतीय वायु सेनेच्या ‘मिराज २०००’च्या १२ लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या तळांवर १००० किलोचे बॉम्ब फेकले होते. यात जवळपास ३०० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती

Aprna

नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा दिला राजीनामा

Aprna

राजकारणातील निवृत्तीपूर्वी सुशीलकुमार शिंदेंनी जनतेची माफी मागावी !

News Desk