HW News Marathi
राजकारण

गेल्या चार साडेचार वर्षात त्याच्यावर खूप अत्याचार झालेत !

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून आपल्या शैलीत मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे. राज ठाकरे यांनी गेल्या साडे चार वर्षात मोदी सरकारमुळे देशाची स्थिती काय झाली आहे यावर भाष्य करणारे एक व्यंगचित्र आपल्या फेसबुकवर पोस्ट केले आहे.

धनत्रयोदशीला लोक जशी धनधान्याची पूजा करतात त्याचप्रमाणे हा दिवस वैद्यकीय शास्त्राचा देव ‘धन्वंतरी’ ह्याचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. देवांचा वैद्य म्हणून या धन्वंतरीला ओळखले जाते. त्यामुळे धनत्रयोदशीच्या मुहूर्त साधून राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी या व्यंगचित्रात भारताला आयसीयूमध्ये दाखविले आहे. यात ‘काळजीचे कारण नाही मात्र देशाची ही परिस्थिती गेल्या साडे चार वर्षात झाली असून त्याच्यावर खूप अत्याचार झाले आहेत. लोकसभा निवडणुकांनंतर देश शुद्धीवर येईल.’, असे देव धन्वंतरी काळजीत पडलेल्या लोकांना सांगत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी ‘मविआ’ आक्रमक; विधानभवनाच्या पायर्‍यांवर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

Aprna

तुम्हाला जनतेने राज्य दिले, आता मंत्रिमंडळ विस्तार तरी करा !

News Desk

द्रौपदी मुर्मी देशाच्या 15 व्या राष्ट्रपती, आज सरन्यायाधीश देणार गोपनीयतेची शपथ

Aprna