HW News Marathi
राजकारण

भारताला जगामध्ये ना मर्द म्हटले जाईल | संजय राऊत

नवी दिल्ली | ‘पाकिस्तानच्या हल्ल्याचे जशास तसे उत्तर द्यावे. जर या हल्लयाचे प्रत्युत्तर दिले नाही. तर भारताला जगामध्ये नामर्द म्हटले जाईल,’ असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ‘पाकिस्तानने भारतावर मिसाईल हल्ला केला आणि आपल्याकडील मिसाईल या केवळ २६ जानेवारीला राजपथावरील संचलन व शक्ती प्रदर्शनासाठीच आहेत का? परदेशातील प्रमुखांना दाखवण्यासाठीच आहेत का?’ असे अनेक प्रश्न ही राउत यांनी यावेळी उपस्थित केले आहेत.’

जम्म-कश्मीरच्या राजौरी आणि पूँछ या भागात पाकिस्तानाने गोळीबारीबरोबर थेट मिसाईलने हल्ला चढविला. या हल्ल्यात एक कॅप्टनसह ४ जवान शहीद झाले असून दोन स्थानिक नागरिकही जखमी झाले आहेत. सध्या दोन्ही बाजूने गोळीबार सुरू आहे. भारतीय सैनिकांनी वेळोवेळी पाकच्या सैनिकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. दुसरीकडे विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. पाकिस्तानच्या या कृत्यावरुन देशभरात संताप व्यक्त होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एखाद्याला आलेला झटका हे राज्याचे धोरण नव्हे | राज ठाकरे  

News Desk

महाआघाडीचा तिढा अखेर सुटला, काँग्रेस २४ तर राष्ट्रवादी २० जागांवर निवडणुका लढविणार

News Desk

तरीही मृदंगाचा गजर सुरूच आहे !

News Desk