HW News Marathi
राजकारण

…तरचं हार्दिक पटेल पिणार पाणी 

अहमदाबाद । सरकारने चर्चा करणार असल्याचे केवळ आश्वासन दिले परंतु अजूनपर्यंत सरकारचा एकही प्रतिनिधी चर्चेसाठी आलेला नाही. त्यामुळे पुढल्या 24 तासात जर सरकारचे प्रतिनिधी चर्चेसाठी आले नाहीत, तर हार्दिक पाणी देखील बंद करेल. त्यानंतर जोपर्यंत सरकार चर्चा करत नाही तोपर्यंत तो पाणी पिणार नाही,’असा इशारा पाटीदार आंदोलन समितीकडून देण्यात आला आहे.

“आमच्या सर्व समाजाला हार्दिकची काळजी आहे, आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करीत आहोत. परंतु सरकार या उपोषणाकडे जाणीवपूर्व दुर्लक्ष करून लोकांची दिशाभूल करीत आहे.’ असा आरोप आंदोलन समितीचे संयोजक मनोज पनारा यांनी केला

हार्दिक पटेल यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी, पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी 25 ऑगस्टला या उपोषणाला सुरुवात केली. तब्बल 12 दिवस उलटून गेल्यानंतरही आश्वासन देऊनही सरकारकडून चर्चा करण्यासाठी एकही प्रतिनिधी आंदोलनाच्या ठिकाणी येत नसल्यामुळे अखेर पाटीदार आंदोलन समितीच्या संयोजकांनी सरकारला हा इशारा दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कलम ३७० हटविल्यानंतर काश्मीर खऱ्या अर्थाने भारतात विलीन झाले !

News Desk

आपण संघाच्या चांगल्या गोष्टी आत्मसात करायला हव्यात !

News Desk

मोदी सरकारच्या नोटाबंदी-जीएसटीमुळे देशात आर्थिक मंदी !

News Desk