HW News Marathi
राजकारण

लोकसभेच्या २ महिन्यांपूर्वीच अर्जुन खोतकर अन् आमच्यात सेटलमेंट झाली होती !

जालना | “लोकसभा निवडणुकीच्या २ महिन्यांपूर्वीच अर्जुन खोतकर आणि आमच्यात सेटलमेंट झाली होती. नंतर जे होते ते फक्त नाटक सुरु होते,” असा धक्कादायक खुलासा केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. खरंतर, लोकसभा निवडणुकीदरम्यान जालना मतदारसंघावरून रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात मोठा वाद रंगला होता. अनेक बैठकांनंतरही जालना मतदारसंघांचा तिढा सुटता सुटत नव्हता. त्यावेळी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यात मध्यस्थी देखील करावी लागली होती. मात्र, रावसाहेब दानवेंच्या या वक्तव्यामुळे आता याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

लोकसभा निवडणुकीपूर्वी जालना मतदारसंघावरून दानवे आणि खोतकर यांच्यात वाद सुरु झाला होता. अनेक बैठकांनंतरही हा वाद काही मिटत नव्हता. मात्र, औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीनंतर अखेर अर्जुन खोतकर यांनी या मतदारसंघातून माघार घेतली आणि रावसाहेब दानवेंचा मार्ग मोकळा झाला. त्यापूर्वी अर्जुन खोतकर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेतली होती. त्यावेळी तेथे पंकजा मुंडे या देखील समन्वयक म्हणून उपस्थित होत्या. “मी उद्धव ठाकरे यांच्यापुढे प्रस्ताव ठेवले आहेत. जालन्यात एक तर मैत्रीपूर्ण लढत व्हावी किंवा जालना शिवसेनेला सुटावी. जालन्याची जागा शिवसेना निश्चित जिंकून येईल, हा विश्वास मला आहे”, अशीही प्रतिक्रिया खोतकर यांनी दिली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केवळ मुंबई-पुण्यासारख्या शहरांनाच शिवसेनेच्या नेत्यांची नावे शोभतील !

News Desk

राजेश कुंटेंच्या याचिकेवर 10 ऑगस्टला होणार सुनावणी

News Desk

नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज जाहीर सभा

News Desk