HW News Marathi
राजकारण

कपिल पाटील, जालिंदर सरोदे यांचे उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई | विधान परिषद निवडणुकीसाठी मुंबई शिक्षक मतदार संघातून आमदार कपिल हरिश्चंद्र पाटील आणि मुंबई पदवीधर मतदार संघातून जालिंदर देवराम सरोदे यांनी मंगळवारी कोकण भवन बेलापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत लोक भारतीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी टीडीएफचे नेते माजी आमदार जे. यु. नाना ठाकरे, राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार, सोशालिस्ट पार्टीचे नेते डॉ. अभिजित वैद्य, लोकतांत्रिक जनता दलाच्या नेत्या सुशीलाताई मोराळे, कामगार नेते शशांक राव, एस.एम.जोशी सोशालिस्ट फाउंडेशनचे प्रा. सुभाष वारे, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचे सुधीर देसाई, बुक्टोच्या मधू परांजपे, ताप्ती मुखोपाध्याय, लोकशाहीर संभाजी भगत, ओबीसी नेते प्रा. श्रावण देवरे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माधव बावगे, संस्थाचालकांचे नेते विनय राऊत, सदानंद रावराणे, अमोल ढमढेरे, सतीश लोटलीकर, रोहन भट, आर. यु. सिंह, राजाराम काळे, शशांक म्हात्रे, मुख्याध्यापक संघटनेचे नेते रामनयन दुबे, संजय पाटील, सुदाम कुंभार, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, शिक्षकेतर कर्मचारी यांचे नेते शिवाजी खांडेकर, प्राथमिक शिक्षकांचे नेते नवनाथ वस्ती यांच्यासह हजारो शिक्षक, पदवीधर उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुशीलाताई मोराळे म्हणाल्या की, कपिल पाटील यांना आम्ही केवळ मुंबईचे आमदार मानत नाही, तर ते महाराष्ट्राचे आमदार आहेत. आमदार म्हणून कपिल पाटील सर्वांची कामे करतात. महाराष्ट्राच्या चळवळीतील लोक कपिल पाटील यांच्या सोबत आहेत असेही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या. मंगळवारी उमेदवारी अर्ज भरताना टीडीएफचे नेते माजी आमदार जे. यु. नाना ठाकरे आणि नानासाहेब पुंदे यांनी आमदार कपिल पाटील आणि जालिंदर सरोदे यांना टीडीएफचा पाठिंबा जाहीर केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मानहानी प्रकरण: राहुल गांधी शिक्षेविरोधात सूरत न्यायालयात याचिका दाखल करणार

Aprna

इंग्रजांना जाऊन ७२ वर्षे झाली, आता त्यांचे प्रोटोकॉल बंद करा !

News Desk

‘ईव्हीएम’वर अविश्वास म्हणजे जनतेवर अविश्वास, मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला

News Desk