HW News Marathi
राजकारण

जाणून घ्या…महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाबाबत

१ मे हा दिवस आपण “महाराष्ट्र दिन” आणि “जागतिक कामगार दिन” म्हणून साजरा करतो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, हे सर्वांनाच माहिती आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा नकाशा खुप वेगळा असा होता. भारतातील अनेक राज्य एकत्रच होते. मात्र काही काळानंतर या राज्यांना भाषा आणि क्षेत्राच्या आधारावर त्यांची विभागणी करण्यात आली. भारतातील एकूण २९ राज्यांची विशेष अशी ओळख, परंपरा, संस्कृती आहे. भारतातील सर्वच राज्य आपापला स्थापना दिवस साजरा करित असतात. त्याचप्रमाणे दरवर्षी १ मे ला महाराष्ट्र दिवस साजरा करण्यात येतो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी १०६ जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. त्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा हा दिवस असतो. या दिवशी राज्य सरकारकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी दरवर्षी १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. दर वर्षी १ मे रोजी जगभरातील जगभरातील ८० देशांमध्ये सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात येते. या दिवशी कामगार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. कामगार संघटना तसेच उद्योजक व सरकारतर्फे उत्कृष्ट कार्य करणार्‍या कामगारांचा गौरव करण्यात येतो. भारतातील पहिला कामगार दिन लेबर किसान पार्टी हिंदुस्थान या संघटनेकडून तत्कालीन मद्रास शहरात म्हणजेच आताच्या चेन्नईमध्ये १ मे १९२३ रोजी साजरा करण्यात आला. कामगार नेते सिंगरवेलू चेत्तीअर यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला होता.

जगात औद्योगिक क्रांतीच्या काळापासून कामगारांना रोजगार मिळाला मात्र त्यांची पिळवणूक होऊ लागली. निकृष्ट सुविधा, अत्यल्प मोबदला आणि अवाजवी कामाचे तास यामुळे कामगारांमध्ये असंतोष वाढत गेला. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अन्यायाविरोधात, उद्योजकांच्या जाचक नियमांविरुद्ध एकत्र येत कामगार संघटनांची निर्मिती झाली. प्रत्येक कामगाराची कामाची वेळ ही केवळ ८ तास असावी, अशी मागणी होऊ लागली. मात्र, उद्योजक याला जुमानत नसल्याने कामगार संघटनांची २ आंतरराष्ट्रीय अधिवेशने झाली. १८९१ सालापासून कामगारांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी १ मे हा दिवस जगभरात कामगारदिन म्हणून पाळला जातो. १ मे दिवस आंतरराष्ट्रीय ऐक्याचे, स्वातंत्र्याचे माणसाकडून होणा-या माणसाच्या पिळवणूकीच्या अंताचे प्रतीक बनला. १ मे दिवस ही सगळ्या कामगार चळवळीची परंपरा झाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर राज्यात नवी समीकरणे निर्माण होऊ शकतात !

News Desk

लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी तयारीला लागा !

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी हिटलरच्या रणनितीचा वापर करतात !

News Desk