HW News Marathi
मुंबई राजकारण

सभागृहाच्या सार्वभौमत्वावर घाला घालून चुकीचे पायंडे पाडू नका; अजित पवारांनी सरकारला सुनावले खडेबोल

मुंबई | विधीमंडळाच्या सभागृहाचे कामकाज प्रथा, परंपरा व नियमाला धरुन चालावे यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) कायम आग्रही असतात. आज राज्याचे एक मंत्री बैठकीत व्यस्त असल्याने प्रश्न राखून ठेवण्याची वेळ विधानसभेच्या सभागृहात आल्यावर अजित पवार चांगलेच संतप्त झाले. विधीमंडळ सुरु असताना विधीमंडळाच्या कामकाजालाच (Maharashtra Legislature) मंत्र्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, चुकीचे पायंडे पाडून सभागृहाच्या सार्वभौमत्वावर घाला घालू नका अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला खडेबोल सुनावले.

राज्याच्या मंत्रीमंडळातील मंत्री बैठकीत व्यस्त असल्यामुळे विधानसभेत आज प्रश्न क्रमांक दोन राखून ठेवण्याची नामुष्की सरकारवर आली आहे. या गोष्टी सभागृहात वारंवार घडत आहेत. सभागृहाच्या प्रथा, परपंरा पायदळी तुडविण्याचे काम सुरु आहे. मंत्र्यांच्या अनुपस्थितीने प्रश्न राखून ठेवण्याचे समर्थन करता येणार नाही. विधीमंडळाच्या इतिहासात मंत्री बैठकीत व्यस्त असल्यामुळे प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न राखून ठेवल्याचे यापूर्वी एकही उदाहरण नाही. त्यामुळे विधीमंडळ सुरु असताना विधीमंडळाच्या कामकाजालाच सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, सभागृहात चुकीचे पायंडे पाडता कामा नये, अशा शब्दात अजित पवार यांनी सरकारचा समाचार घेतला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य रेल्वेच्या वाहतुकीला ब्रेक, वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल

News Desk

रेल्वे अंगावरून जाऊनही जिवंत | सीसीटिव्हीत कैद

News Desk

विधासभा निवडणुकीच्या निमित्ताने जनतेला काँग्रेसच्या युवा चेहऱ्यांची ओळख

swarit