HW News Marathi
राजकारण

दूध-अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा

मुंबई | दूध आणि अन्न पदार्थामध्ये भेसळ करणाऱ्यावर यापुढे कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी विधानपरिषदेमध्ये केली आहे. अशा प्रकारचे गुन्हेगारांसाठी जन्मठेपेच्या शिक्षेची तरतुद करण्यात यावी असल्याची माहिती बापट यांनी विधानपरिषदेमध्ये दिली. याच अधिवेशनात तसा कायदा करण्यात येणार असल्याचे त्यांनी देखील ते म्हटले आहे.

यापूर्वी अन्नपदार्थामध्ये भेसळ करणाऱ्यांसाठी फक्त सहा महिन्यांच्या शिक्षेची तरतूद होती. त्यातही आरोपींना जामीन मिळत होता. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांवर कायद्याचा धाकही उरला नव्हता. त्यामुळे अशा भेसळखोरांवर आता अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दूध भेसळीबाबत विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मार्च महिन्यात गिरीश बापट यांनी दूध भेसळखोरांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद करण्याचं आश्वासन दिलं होतं.

त्यानंतर दूध भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करावी, अशी मागणी अनेक आमदारांनी केली होती. आता विधानपरिषदेत काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गिरीश बापट यांनी ही घोषणा केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप उमेदवारांची आज होणार घोषणा

News Desk

बसपऐवजी चुकून भाजपला मत दिले म्हणून चक्क स्वतःचे बोटच कापले

News Desk

एकाकी लढून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही

News Desk