HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : सुजय विखे पाटील यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश

मुंबई | डॉ. सुजय विखे पाटील आज (१२ मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार केला आहे. सुजय हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव आहेत. अहमदनगरमधून सुजयला काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढविणार आहे.

यावेळी सुजय यांनी म्हटले की, “वडिलांच्या इच्छेविरोधात जाऊन हा निर्णय घ्यावा लागला. संकटकाळी ज्यांनी मला साथ दिली मी त्यांच्यासोबत राहणार असून अहमदनगरमध्ये पक्षाच्या वाढीसाठी काम करणार असल्याचे यावेळी सुजय यांनी सांगितले. आमच्या कार्यकर्त्यांना भाजपच्या घोषणा देण्यात सवयी होण्यास थोडा वेळे लागेल. त्यामुळे मी ‘भाजपचा विजय असो’,” अशा घोषणा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

“आम्ही सुजय यांचे नाव पक्षश्रेष्ठींकडे पाठविणार आहोत. आम्हाला खात्री आहे की, त्यांच्या नावावर शिक्कामोतर्ब होणार असून ते अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सुजय यांच्या पक्षप्रवेशा वेळी बोलत होते.” सुजय विखे-पाटलांच्या या पक्ष प्रवेशादरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, चंद्रकांतदादा पाटील, रावसाहेब दानवे, बबनराव पाचपुते आदी नेते उपस्थित होते.

गेल्या अनेक दिवसांपासून सुजय यांच्या पक्ष प्रवेशावरून राजकारण सुरू होते. परंतु आज भाजपमध्ये प्रवेश केल्याने संपूर्ण चर्चेला पूर्णविराम लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (१२ मार्च) झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाल की, राष्ट्रवादीच्या जागेवर आमचा उमेदवार लढणार असल्याचे पवारांनी यावेळी सांगितले होते. यानंतर सुजय यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कमोर्तब झाला होता. परंतु राधाकृष्ण विखे पाटील आता नेमके काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसला ४० पेक्षा अधिक जागा मिळाल्या तर मोदी स्वत:ला फाशी लावून घेणार का?

News Desk

…मग शेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन का नाही ?

News Desk

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे भाजपाच्या मुसक्या आवळल्या

News Desk