HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : मनसे-राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेत प्रचंड तफावत !

मुंबई | “राज ठाकरेंची मनसे आणि राष्ट्रवादीच्या विचारांमध्ये प्रचंड तफावत आहे. युती ही विचारांच्या आधारावर व्हायला हवी. राज ठाकरेंनी राष्ट्रवादीची साथ द्यायला नको होती”, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. नितीन गडकरी हे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. यावेळी त्यांनी मनसे-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळीकीबद्दल भाष्य केले आहे.

“राज ठाकरे यांचे विचार स्पष्ट होते. माझे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. मी कधीही माझ्या मित्रांचा हात सोडत नाही. परंतु, निवडणुकीदरम्यान काय बोलावे हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. जशी भाजप-शिवसेनेची युती ही हिंदुत्वाच्या आधारावर तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी त्यांची विचारधारा मिळती-जुळती असल्याने झाली तसे मनसे आणि राष्ट्रवादीचे नाही”, असेही यावेळी नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सार्वजनिक, घरगुती कार्यक्रमात शीतपेयऐवजी दूध द्या | नितीन गडकरी

News Desk

विद्या चव्हाण यांनी विधानभवनाच्या प्रांगणात रावतेंना का आडविले

News Desk

“शिवसैनिकांच्या डोळ्यातील अश्रूंची किंमत मोजावी लागणार,” उद्धव ठाकरेंचा बंडखोरांना इशारा

Aprna