HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : शिवसेनेपुढे जालन्यानंतर आता उस्मानाबादचा तिढा

मुंबई | जालना लोकसभा मतदारसंघावरून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यामध्ये वाद सुरु असतानाच आता शिवसेनेपुढे उस्मानाबाद मतदारसंघाच्या उमेवारीचा देखील प्रश्न उभा राहिला आहे. उस्मानाबाद मतदारसंघासाठी सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे, खासदार रवींद्र गायकवाड आणि मकरंदराजे निंबाळकर यांच्या नावावर सध्या खल सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

तब्बल ३० वर्षांपासून शिवसेनेचे एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून अनिल खोचरे यांना देण्याची मागणी त्यांच्या समर्थकांकडून केली जात आहे. त्याचप्रमाणे अनिल खोचरे यांचे भाजपशी देखील अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्याचप्रमाणे रवींद्र गायकवाड यांची प्रतिमा ‘नॉट रिचेबल खासदार’ म्हणून असल्याचे ‘मातोश्री’वर सांगण्यात आले आहे. तर मकरंदराजे निंबाळकर यांच्या हॉटेलचे बांधकाम नियमबाह्य असल्याने त्यांचीही उमेदवारी बाद होऊ शकते.

जालन्याच्या उमेदवारीबाबत उद्या (१७ मार्च) औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंतिम निर्णय घेतील अशी माहिती अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. मात्र, आता उस्मानाबाद मतदारसंघाच्या तिढ्याचे काय ? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबत काय निर्णय घेणार ? , हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज दसरा मेळाव्यात काय बोलणार उद्धव ठाकरे?

News Desk

मनसेचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर

swarit

Live Update : खुशखबर ! मराठा समाजाला अखेर यश

News Desk