HW News Marathi
राजकारण

महाराष्ट्रात जागावाटपावरून महाआघाडीला सुरूंग

मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीने महाराष्ट्रात महाआघाडीची मोर्चे बांधणीला सुरुवात केली होती. परंतु महाराष्ट्रात महाआघाडी होण्याची मोर्चे बांधणीला सुरुवात होताच त्याला सुरूंग लागल्याचे चित्र सध्या दिसत आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यानंतर लोकतांत्रिक जनता दलाचे नेते कपिल पाटील यांनी महाआघाडीबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कोणत्याही मुद्दे आणि अजेंड्याची चर्चा न करता मित्रपक्षांना परस्पर तीन जागा दिल्याबद्दल पाटील यांनी खुले पत्र लिहून नाराजी व्यक्त केली.

पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना खुले पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली. प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय महाराष्ट्रात महाआघाडीला पूर्ण स्वरूप येऊ शकणार नाही. आंबेडकर, राजू शेट्टी यांना एक-एक जागा सोडली व अन्य पक्षांना विधानसभेत जागा सोडण्याचे आश्वासन दिले की आघाडी झाली, असे मानत असाल तर वास्तवापासून आपण खूप दूर आहोत, असे पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.

चाळीस ते पन्नास टक्के वर्गाच्या प्रश्नाला महाआघाडी अजेंड्यावरच स्थान नसेल तर आंबेडकर यांच्याशी सन्मानाने चर्चा कशी होणार, असा प्रश्न पाटील यांनी पत्रातून विचारला. मुद्दे आणि अजेंड्याची चर्चा न करता मित्र पक्षांना तीन जागा सोडून काँग्रेस, राष्ट्रवादीने आघाडी झाल्याचे जाहीर केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करतानाच छोट्या डाव्या पुरोगामी पक्षांनी प्रचाराच्या वाजंत्री वादनाचे काम करायचे का, असे पाटील म्हणाले आहेत. परंतु किमान, वाजंत्री कोणत्या मुद्द्यांची वाजवायची हे तरी स्पष्ट करा, असा टोलाही कपिल पाटील यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना हाणला आहे..
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याचे मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत, ते पंचांग बघून मंत्रिमंडळ विस्तार करतील !

News Desk

कितीही चौकशी केल्या, तरी माझे तोंड बंद होणार नाही !

News Desk

शिवसेनेशिवाय कोणीही सत्ता स्थापन करू शकणार नाही !

News Desk