HW News Marathi
राजकारण

आमच्याकडे सर्वच जण पंतप्रधान असतील !

नवी दिल्ली | “आमच्याकडे सर्वच जण पंतप्रधान असतील. देशातला प्रत्येकजण पंतप्रधान असेल. आमचे सरकार हे जनतेचे सरकार असेल”, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. विरोधकांचे नेतृत्त्व कोण करणार ? पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण असणार ? असे प्रश्न विचारण्यात आल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी हे सोयीस्कर उत्तर दिले आहे. पश्चिम बंगालमधील सीबीआय आणि स्थानिक पोलिसांच्या वादावर आज झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर ममता बॅनर्जी पत्रकारांशी बोलत होत्या.

“आमच्याकरिता सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान नमूद केलेले मुद्दे हा नैतिक विजय असून आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांचे पालन करू. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय स्वागतार्ह असून यामुळे अधिकारी वर्गाचे मनोबल उंचावेल”, असा विश्वास ममता बॅनर्जींनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, जेव्हा ममता बॅनर्जींना पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी अत्यंत विचारपूर्वक या प्रश्नाचे उत्तर दिले. “आमच्याकडे सर्वच जण पंतप्रधान असतील. देशातला प्रत्येकजण पंतप्रधान असेल. आमचे सरकार हे जनतेचे सरकार असेल”, असे उत्तर ममता यांनी यावेळी दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#ElectionsResultsWithHW : आमची आघाडी जनतेच्या पसंतीस उतरली नाही !

News Desk

#LokSabhaElections2019 : भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत महाराष्ट्रातील १६ उमेदवारांची नावे

News Desk

RamMandir : उद्धव ठाकरे फैजाबाद विमानतळावर दाखल

News Desk