HW News Marathi
राजकारण

ममता बॅनर्जी मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत

नवी दिल्ली | यंदा एनडीएने लोकसभेत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर ३० मे रोजी नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदी येत्या गुरुवारी म्हणजेच ३० रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतील. राष्ट्रपती भवनात ३० मे रोजी संध्याकाळी ७ वाजता मोदींचा शपथविधी सोहळा पार पडेल. दरम्यान, या शपथविधी सोहळ्याला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित राहणार होत्या. मात्र, आपल्या निर्णयावरून यू-टर्न घेत मोदींच्या शपथविधी सोहळ्याला न जाण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे.

मनात बॅनर्जी यांनी यासंबंधी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. “मी तुमचे संविधानिक आमंत्रण स्वीकारले होते. त्यासाठी येण्याची तयारी देखील केली होती. मात्र, गेल्या काही वेळात माध्यमांचे रिपोर्ट्स पाहिले. भाजपकडून पश्चिम बंगालमध्ये ५४ राजकीय हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु हे चुकीचे आहे. या हत्या राजकीय हेतूने झाल्या नसून त्या परस्परांच्या वादातून, कौटुंबिक भांडण आणि इतर कारणांमुळे झाल्या आहेत. याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही”, असे ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’त उर्मिला मातोंडकर सहभागी; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna

चिमुरडीवर बलात्कार प्रकरणातील आरोपीचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला

News Desk

रामदास आठवले हे प्रामाणिक कार्यकर्ते | राजा ढाले

News Desk