HW News Marathi
राजकारण

#मीटू : एम. जे. अकबर यांची ९७ वकिलांची फौज

नवी दिल्ली | मीटू मोहिमेतून एका महिला पत्रकारने केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. या महिला पत्रकाराविरोधात अकबर यांनी मानहानीचा दावा केला आहे. अकबर यांनी स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी जवळपास ९७ वकिलांची फौज न्यायालयात उभी करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

अकबर यांच्यासाठी करांजवाला अँड कंपनी ही लॉ फॉर्म मैदानात उतरणार आहे. यात केवळ ३५ महिला वकील असून या ९७ वकीलांपैकी केवळ ६ विकलच प्रत्यक्ष न्यायालयात अकबर यांची बाजू मांडतील, असे करांजवाला अँड कंपनीकडून सांगण्यात आले आहे. एम. जे. अकबर संपादक पदावर असताना त्यांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप १० महिलांनी केला आहे.

मात्र हे आरोप खोटे असल्याचे अकबर यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीआधी आपली प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूनेच हे आरोप होत असल्याचं त्यांनी म्हटले आहे. अकबर यांनी निर्दोष सिद्ध करण्यासाठी सर्व महिलांना विरोधात मानहानीचा दावा केला आहे. या महिलांसाठी न्यायालयात खेचले असून यांच्या विरोधात न्यायालयात ९७ वकीलांची फौज सज्ज आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऋतुजा लटकेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा! उमेदवारीचा मार्ग मोकळा

Aprna

यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाजाचा दर १२८ टक्के

News Desk

लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये जागावाटपवर शिक्कामोर्तब

News Desk