HW News Marathi
राजकारण

ईडीच्या नोटीशीविरोधात मनसे २२ ऑगस्टला ठाणे बंदचे आवाहन

मुंबई | कोहिनूर मिल ३ खरेदी प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) नोटीस पाठविण्यात आली आहे. राज ठाकरे यांना २२ ऑगस्ट रोजी चौकशी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. ठाण्यात गुरुवारी (२२ ऑगस्ट) ठाणे बंद करण्याचा इशारा जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिले आहेत. तसेच २२ ऑगस्टला कायदा सुव्यवस्था बिघडल्यास सरकार जबाबदार राहील, असा धमकी वजा इशारा प्रशासनाला जाधव यांनी दिला आहे.

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात रान पेटवले होते. तसेच नुकतेच ईव्हीएमविरोधात विरोधकांची एकजूट करून त्यांनी आवाज उठवला आहे. त्यानंतर आता कोहिनूर मिलच्या संदर्भात ईडीची चौकशी लावण्याचे संकेत भाजप सरकारने दिले आहेत. २२ ऑगस्टला जर राज ठाकरे यांना चौकशीसाठी बोलावले तर ठाणे बंद करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले आहे. यासंदर्भात कार्यकर्त्यांची बैठक देखील घेण्यात येणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

ईव्हीएमच्या विरोधात राज ठाकरे यांनी देशभर आंदोलन केल्यामुळेच सरकार कडून हा राजकीय सूड उगवण्यासाठी हा कट रचल्याचे मनसेकडून बोले जात असून संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेष करून ठाण्यात यामुळे तीव्र आंदोलन छेडले जाईल असे जाधव यांनी सांगितले

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिंदे गटाला ‘ढाल-तलावर’ चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले

Aprna

लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त शेअर बाजारासाठी नकारात्मक

News Desk

भाजपला काँग्रेस मुक्त नाही, तर मुस्लिम-मुक्त भारत पाहिजे !

swarit