HW News Marathi
राजकारण

मोदी सरकारने नोटबंदी करून मुंबईकरांवर आक्रमण केलं

मुंबई | देशात महा आघाडी करणे ही केवळ विरोधी पक्षांचीच नाही तर देशातील लोकांची भावना झाली आहे. अनेक पक्ष या महा आघाडीत जोडले जात आहेत. त्याचप्रमाणे भाजपा, संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लोकांमध्ये आक्रोश आहे. ज्याप्रकारे मोदी, संघ, आणि भाजप संसदीय लोकशाहीवर आक्रमण करून ती संपवू पाहत आहे, तिचे रक्षण करण्याची गरज आहे. त्यासाठी देशाला आणि मोदी, संघ, भाजपा विरोधातील पक्षांना आणि जनतेला जोडण्याचे काम काँग्रेस करत आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे हे मोदी सरकार सर्वात श्रीमंत लोकांसाठी काम करत आहे. गरिबांच्या खिशातून पेट्रोल- डिझेलमधून पैसा काढून ते 15- 20 श्रीमंतांच्या खिशात घालण्याचे काम करत आहे. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या एका ब्यारेलची किंमत ही 140 रुपये होती आज ती 70 रुपयांच्या दरम्यान आहे, त्यामुळे पेट्रोल-डिझेल वरील सर्व पैसा हे मोदी सरकार श्रीमंतांच्या खिशात टाकत आहे, त्यांच्यासाठी काम करत आहे.

मोदी सरकारने नोटबंदी करून मुंबईकरांवर आक्रमण केले, त्यांचे छोटे उद्योग आणि रोजगार अडचणीत आणले. मुंबईतील कपडा, लेदर आदी अनेक उद्योग अडचणीत आले आणि त्यानंतर गब्बरसिंग टॅक्स लावून त्यांना पुन्हा अडचणीत टाकले. यामुळे मुंबईतील आणि देशातील लहान उद्योजक, दुकानदार, सर्वसामान्य जनता दुःखी आहे. मी मुंबईला जेव्हा येतो, त्या-त्या वेळी माझे मुंबईकर माझे चांगले स्वागत करतात. त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो असेही राहुल गांधी यावेळी पत्रकार परिषदेत म्हणालेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“विधान परिषद निवडणुकीत केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग”, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Aprna

निवडणुका जवळ आल्या की, घोषणांचा असा ‘मोसम’ सुरू

News Desk

अजित पवारांच्या बंगल्यावर ‘मविआ’ची बैठक सुरू; उद्धव ठाकरेंसह महत्वाचे नेते बैठकीला हजर

Aprna