HW News Marathi
राजकारण

पंतप्रधानांकडून ‘किसान सन्मान निधी’चे उदघाटन

नवी दिल्ली । देशाच्या या अंतरिम अर्थसंकल्पात मोदी सरकारकडून देशभरातील ५ एकरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी ६००० रुपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ या योजनेद्वारे शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी रविवारी (२४ फेब्रुवारी) या योजनेचे उदघाटन केले.

पंतप्रधान मोदींनी एक बटण दाबल्यानंतर तब्बल एक कोटी एक हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये प्रत्येकी २,०२१ रुपयांची रक्कम जमा झाली आहे. तसेच बाकी शेतकऱ्यांचे पैसेही काहीच दिवसांमध्ये त्यांच्या खात्यात जमा होतील, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी म्हटले आहे. केंद्राकडून या योजनेसाठी प्रत्येक वर्षाला ७५ हजार कोटी रुपये इतका खर्च येणार आहे.

“आम्हाला इतरांसारखा केवळ निवडणुकांसाठी शेतकऱ्यांचा कळवळा नाही. म्हणूनच आम्ही आधीपासून पैशाची जुळवाजुळव करून आता ही योजना जाहीर केली आहे. हे सहन न झालेले महाघोटाळेबाज यावर टीका करून लोकांची दिशाभूल करीत आहेत. मोदी पैशाचे एक-दोन हप्ते देतील आणि निवडणुकांनंतर हे पैसे बंद करतील, असे म्हटले जात आहे. परंतु ते पैसे तुमच्या हक्काचे आहेत. ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही”, असे आश्वासन मोदींनी यावेळी दिले आहे.

प्रत्येक शेतकऱ्याला दर वर्षाला केवळ ६००० रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची मोठी थट्टा आहे. मोदी सरकार केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच या योजनांची घोषणा करीत आहे, अशा प्रकारचे आरोप विरोधकांकडून करण्यात आले होते. या आरोपांना मोदींनी प्रत्युत्तर दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुम्ही ‘त्यांनी’ दिलेले पैसे घ्या, मात्र मत ‘आप’लाच द्या !

News Desk

राहुल गांधींनी मोदींना ‘जादू की झप्पी’ नव्हे, ‘झटका’ दिला | संजय राऊत 

News Desk

#LokSabhaElections2019 : मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर अचानक जानकरांचा सूर बदलला !

News Desk