HW News Marathi
राजकारण

देशात मोदी-शाह जोडीचा प्रयोग फसला म्हणून मोदींनी पत्रकार परिषद घेतली !

मुंबई | “पंतप्रधान मोदींना लोकसभा निवडणुक निकालाच्या तोंडावर ५ वर्षानंतर पंतप्रधान मोदींना पत्रकार परिषद घ्यावी लागली. हा बदल कसा झाला ? देशात मोदी-शाह जोडीचा प्रयोग फसला आहे. पंतप्रधान मोदींना लोकांची नाराजी लक्षात आली आहे”, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लगावला आहे. ते सोलापूरमध्ये बोलत होते.

“राज्यातील दुष्काळ काँग्रेस उपसमिती अहवाल प्राप्त झाला असून राज्यातील दुष्काळस्थिती भीषण आहे. सरकारने दुष्काळाबाबत केवळ आश्वासने दिली आहेत. मात्र, अंमलबजावणी झाली नाही. सरकार सध्या त्यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सचा खेळ सुरु केला आहे. दुष्काळग्रस्तांची मते घेतली, पण या गंभीर समस्येचे काय ?”, असा सवाल अशोक चव्हाण यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रसारमाध्यमांच्या सकारात्मक योगदानामुळेच भारताला शंभर वर्षातील सर्वात मोठ्या आपत्तीला तोंड देण्यास मदत! – नरेंद्र मोदी

News Desk

#LokSabhaElections2019 : थोड्याच वेळात जाहीर होणार भाजपची पहिली उमेदवार यादी

News Desk

कार्यकर्त्यांचा आग्रह, शरद पवार निवडणूक लढविणार का ?

News Desk