HW News Marathi
राजकारण

पीएम मोदींची शेवटची ‘मन की बात’, शहीद जवानांसाठी ‘नॅशनल वॉर मेमोरियल स्मारक’

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२४ फेब्रुवारी) लोकसभा निवडणुकापूर्वीची शेवटची ‘मन की बात’ हा कार्यक्रम होता. या शेवटच्या मन की बातमध्ये ‘नॅशनल वॉर मेमोरियल स्मारक’ची मोदींनी माहिती दिली. तसेच सोमवार (२५ फेब्रुवारी) रोजी या राष्ट्रीय सैनिक स्मारकाचे लोकार्पण होणार असल्याचे देखील सांगितले. या हल्ल्यातील जवानांच देशाच्या लढवय्या सैनिकांच्या त्याग आणि बलिदानाचा सन्मान करण्याचा हा प्रयत्न असल्याचे मोदींनी म्हणाले.

शेवटच्या ५२ व्या मन की बात कार्यक्रमात मोदींनी १० दिवसांपूर्वी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. भारत मातेने त्यांचे वीर जवाना गमविले आहे. यावेळी मोदींनी दहशतवादाविरोधात एकत्र लढण्याची गरज असल्‍याचे सांगितले. यावेळी त्‍यांनी शहीद जवानांच्या कुटूबियांच्या धैर्याला देखील सलाम केला आहे. त्यामुळे देशात सपोर्ट फॅमिली ऑफ शहीद जवान अशी लाट आल्याचे मोदींनी सांगितले.

लकरच देशात लोकसभा निवडणुकी सुरू होणार आहे. या निवडणुकीनंतरही आपण पुढील मन की बातमधून संवाद साधू असे म्हणत ही निवडणूक जिंकून पुन्हा पंतप्रधानपदी असू असा विश्वास मोदींनी मन की बात मधून व्यक्त केला आहे. पुढे मोदी असे देखील म्हणाले की, पुढील दोन महिन्यांसाठी आम्ही सर्वजण लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात व्यस्त असणार आहोत. मी स्वतः या निवडणुकीत उमेदवार असून निरोगी लोकशाहीचा सन्मान करताना पुढची ‘मन की बात’ ‘मे’ महिन्याच्या शेवटच्या रविवारी होणार असल्याचे देखील यावेळी मोदींनी सांगितल. मार्च, एप्रिल आणि संपूर्ण मे महिना या तीन महिन्यांच्या काळात आमच्या सर्व भावना मी निवडणुकीनंतर नव्या विश्वासाने आणि जोमाने जनतेसमोर पुन्हा एकदा ‘मन की बात’च्या माध्यमांतून मांडेन त्यानंतर अनेक वर्षे आपल्याशी संवाद राहिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता राज्याच्या आरोग्य खात्याचा अधिभार एकनाथ शिंदेंकडे 

News Desk

“शरद पवारांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर पुन्हा सत्तेत येऊ”, सुप्रिया सुळेंचा विश्वास

Aprna

माझे बोट धरुन राजकारणात आलेला माणूस इतका बदलू शकतो ?

News Desk