HW News Marathi
राजकारण

राज्यपालांची भेट घेऊन काँग्रेसचा सरकार स्थापन करण्याचा दावा

नवी दिल्ली | मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने राज्यपाला आनंदीबेन यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे. काँग्रेसचे नेते कमलनाथ, नेते ज्योतिरादित्य सिंधिया, दिग्विजय सिंह, विवेक तन्खा हे काँग्रेसचे शिष्टमंडळाने आज (१२ डिसेंबर) आनंदीबेन यांची भेट घेतली आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेऊन त्यांच्याकडे १२१ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र दिले. तसेच काँग्रेसने सत्ता स्थापन करण्यासाठी पाचारण करण्याची विनंतीही केली.

काँग्रेसला मध्य प्रदेशमध्ये बसपाच्या दोन, सपाच्या एका आणि ४ अपक्षांचा पाठिंबा आपल्याला असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. आम्ही सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. आमच्याकडे १२१ आमदारांचे पाठबळ आहे, असे काँग्रेस नेते नरेंद्र सलुजा यांनी सांगितले. दरम्यान, मध्यप्रदेशातील मुख्यमंत्रीपदाबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. काँग्रेसने अद्यापही त्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने कमलनाथ आणि सिंधिया समर्थकांनी आपआपल्या नेत्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज दुपारी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा दिला आहे.

Related posts

गोव्यात राहुल गांधींनी घेतली पर्रीकरांची भेट, राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

News Desk

“गिरीश महाजन सभागृहात का नाही आले?”, मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून अजित पवारांचा संतप्त सवाल

Aprna

EXIT POLL : तेलंगणातील जनतेचा कौल टीआरएसच्या बाजूने, भाजपची घोर निराशा

News Desk