HW News Marathi
राजकारण

मुंबईतील उमेदवारांची अर्ज भरण्याची लगबग आजपासून सुरू

मुंबई | लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यातील उमेदवारांनी अर्ज भरला आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील ३० मुंबई दक्षिण-मध्य आणि ३१ मुंबई दक्षिण या दोन लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल आज (२ एप्रिल) करण्यास सुरुवात केला होता.

या उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत मंगळवारी (९ एप्रिल) असून या अर्जांची छाननी बुधवारी (१० एप्रिल) होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख १२ एप्रिल २०१९ आहे. मुंबई शहर जिल्ह्यासाठी ५२७ ठिकाणी दोन हजार ६०१ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. धारावीसारख्या दाट लोकसंख्या असलेल्या ठिकाणी एका शाळेत जास्तीत जास्त ५८ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे जोंधळे यांनी सांगितले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदी आज अयोध्येत, धार्मिक स्थळांपासून दूर राहण्याची शक्यता

News Desk

‘हा’ टॉलिवूड अभिनेता पंतप्रधान मोदींविरोधात लढणार

News Desk

कपिल पाटील, जालिंदर सरोदे यांचे उमेदवारी अर्ज दाखल

News Desk