HW News Marathi
राजकारण

नाणार प्रकल्पग्रस्तांनी घेतली राज ठाकरेंची भेट

मुंबई | रत्नागिरी येथील नाणार हे गाव आंबा उत्पादन, पर्यटन मच्छिमारीसाठी संपन्न आहे. सध्या नाणार येथे मोठी रिफायनरी आणण्याचा सरकारचा निर्णय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात ग्रामस्थ एकवटले आहेत. या प्रकल्पाला १५ गावातील लोकांनी विरोध दर्शवला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही हा प्रकल्प नाणार मध्ये होऊ नये यासाठी कंबर कसली आहे. परंतु सेना भाजपच्या राजकारणात न पडता कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेच्या पदाधिका-यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली . लवकरच या प्रकरणावर तोडगा काढू असे आश्वासन यावेळी राज यांनी भेटीसाठी आलेल्या पदाधिका-यांना दिले आहे.

कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटना या प्रकल्पाविरोधात राज्यातील प्रमुख नेत्यांची भेट घेऊन आपल्या विरोधाला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. राज ठाकरेंनी रत्नागिरीत जाऊन या प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांनी १४ एप्रिल रोजी राज ठाकरे यांची मुंबईत येऊन भेट घेतली. पुढे ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचीही भेट घेणार आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्र्यांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या तिजोरीतून उधळपट्टीवर टीकास्त्र

News Desk

…तर तुम्हाला पावसात सभा घेण्याची वेळ आली नसती !

News Desk

कमलनाथ यांच्या सचिवांच्या घरासह तब्बल ५० ठिकाणी आयकर विभागाच्या धाडी

News Desk