HW News Marathi
राजकारण

राज्यात पुन्हा स्थिर सरकार आणायचे असेल, तर देवेंद्र फडणवीसांना पुन्हा निवडून द्या !

नाशिक | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा आज नाशिक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत समारोप झाला. यानिमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेसाठी आज (१९ सप्टेंबर) नाशिकमध्ये आले. मोदींनी उपस्थितांना संबोधित करताना फडणवीस यांची तोंडभरुन कौतुक केले. “महाराष्ट्र गेल्या पाच वर्षात पार्दर्शक कारभार असलेले सरकार विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्रातील जनतेने एक स्थितीर सरकार स्थापन होण्यासाठी पुन्हा संधी देण्याचे आव्हान यावेळी मोदींनी केले.

“महाराष्ट्र पुन्हा लोडशेडींगमध्ये जाऊ नये, म्हणून हेच सरकार पुढे निवडून देणे गरजेचे आहे,” असे म्हणत मोदींनी आघाडी सरकारवर टीका केली आहे. देशात गुजरातने सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा बहुमान मला दिला होता. त्याप्रमाणे आपण देवेंद्र फडणवीस यांना तो बहुमान द्यावा, असे आवाहन मोदींने केले.

राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे महाराष्ट्राने जी प्रगती करायला हवी होती ती झाली नाही. मात्र, राज्यात पूर्ण बहुमत नसताना देवेंद्र फडणवीस यांनी स्थिर सरकार दिले. मागील पाच वर्षात महाराष्ट्रात गुंतवणुकीचं चांगले वातावरण मिळाले, शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये २० हजार कोटींपेक्षा जास्त निधी जमा करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आदी मान्यवर उपस्थित आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकांनी लग्नात पेट्रोल, डिझेल आहेर म्हणून द्यावे | सचिन सावंत

News Desk

अमित शहा मातोश्रीवर दाखल

News Desk

#LokSabhaElections2019 : विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट न देण्याचा भाजपचा निर्णय

News Desk