HW News Marathi
राजकारण

अखेर नवाब मलिकांनी मागितली अण्णा हजारेंची माफी

मुंबई | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी अण्णा हजारेंवर गंभीर आरोप केले होते. आता अखेर आपल्या या आरोपांबद्दल नवाब मलिक यांनी अण्णा हजारेंची माफी मागितली आहे. नवाब मलिक यांना अण्णांकडे आपला माफीनामा हा सादर केला असून अण्णांनी हा माफीनामा स्विकारला आहे. या माफीनाम्यामुळे मलिकांवरील पुढची कारवाई थांबवण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

“अण्णा हजारे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट असून ते पैसे घेऊन उपोषण करतात”, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर अण्णा हजारेंच्या समर्थकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्याचप्रमाणे अण्णा हजारेंकडून बदनामी आणि फौजदारी कारवाईची कायदेशीर नोटीस देखील नवाब मलिक यांना पाठविण्यात आली होती.

नवाब मलिक यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील दिलगिरी व्यक्त केली होती. “नवाब मलिक यांच्या त्या वक्तव्याशी पक्षाचा कोणताही संबंध नाही. मलिक यांच्या वक्तव्यामुळे अण्णा हजारे दुखावले गेले आहेत. यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो”, असे अजित पवार यांनी म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजदंड पळवूनही सभागृह सुरु ठेवणे म्हणजे सार्वभौम सभागृहाचा अवमान । जितेंद्र आव्हाड

News Desk

शिवसेनेचा मनसेवर कार्टून वॉर | तुम्ही अंथरून सोडण्याआधी कार्यकर्ते पक्ष सोडतायत

News Desk

ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांना भाजपकडून उमेदवारी, सोमय्यांना मोठा धक्का

News Desk