HW News Marathi
राजकारण

पवारांवर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

पुणे | शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’मध्ये लिहिलेल्या आजच्या अग्रलेखामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाले आहेत. आजच्या ‘सामना’मधून अजित पवार यांची खिल्ली उडविण्यात आली आहे. यामुळेच आक्रमक होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सामनाचे संपादक संजय राऊत यांच्या विरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आले. यावेळी सामनाचे अंक जाळण्यात आले.

शिवसेनेने राम मंदिर बांधू असे जाहीर केले होते. मात्र ‘ज्यांना अद्याप आपल्या वडिलांचे स्मारक बांधता आले नाही, ते राम मंदिर काय बांधणार ?’ असा खोचक सवाल विचारत अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे ‘सामना’तर्फे आज अग्रलेखात अजित पवार यांची खिल्ली उडविण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सामनाच्या पुण्यातील कार्यालयाजवळील आंदोलन केले.

सामनाने अजित पवार यांच्याबद्दल नेमके काय लिहिले ?

अजित पवार या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणात काडीमात्र किंमत नाही. काकांच्या पुण्याईने व कृपेनेच ते तरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या करंगळीवर तरलेला एकखांबी तंबू आहे. या तंबूचा कळस म्हणजे अजित पवारांची रिकामी खोपडी आहे. आम्ही त्या खोपडीस किंमत देत नाही. अयोध्येत राम मंदिरास विरोध हेच त्यांचे धोरण आहे. अजित पवारांनी प्रभू श्रीरामाचाही अपमान केला. हे महाशय अधूनमधून शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळी परिस्थिती यावर त्यांच्या ‘मुतऱ्या’ थोबाडाने बोलत असतात. शिवसेना सरकारमध्ये बसून महाराष्ट्रातील दुष्काळावर काय करते ?, अशा अत्यंत खालच्या पातळीची टीका सामनाच्या अग्रलेखामधून करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाना पटोले यांचा पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचार आज थंडावणार

News Desk

HW Exclusive | आक्षेप माझ्यावर की महात्मा गांधींच्या विचारावर ?

Gauri Tilekar