HW News Marathi
राजकारण

…तर पवारांची औलाद म्हणून सांगणार नाही !

मुंबई । “आम्ही सत्तेत आल्यानंतर जर ३ महिन्यांमध्ये सातबारा कोरा केला नाही तर पवारांची औलाद म्हणून सांगणार नाही”, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे बारामती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अजित पवार यांनी केला आहे. अजित पवार हे अकलूज येथे आयोजित प्रचारसभेत बोलत होते.

“आम्ही वचनपूर्तीचे राजकारण करणारे आहोत. राज्यात आघाडीची सत्ता आल्यानंतर जर पुढच्या ३ महिन्यांमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही तर पवारांची औलाद म्हणून सांगणार नाही”, असा थेट दावा अजित पवार यांनी केला आहे. यावेळी बोलताना अजित पवार यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नावरून सरकारवर जोरदार टीका देखील केली आहे.

“यंदाची निवडणूक फार महत्त्वाची आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील ही लढाई आपल्याला जिंकायची आहे. या सरकारने ‘अच्छे दिन’चे गाजर दाखवून सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ केला. सर्वसामान्यांच्या अपेक्षांचा भंग केला आहे”, असे म्हणत अजित पवार यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अब्दुल सत्तार गद्दार, चंद्रकांत खैरेंची घणाघाती टीका

News Desk

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ११ नोव्हेंबरला चक्काजामचा इशारा

Gauri Tilekar

इंद्रनील राजगुरू यांनी ‘आप’ला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये केली घरवापसी

Darrell Miranda