HW News Marathi
राजकारण

जितेंद्र आव्हाडांनी आमदाराकीचा दिला राजीनामा; जयंत पाटील म्हणाले…

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आमदाराकीचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडे सुपूर्त केला आहे.  कळवा खाडी पुलाचे रविवारी (13 नोव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यादरम्यान एका महिलेने आव्हाडांनी चुकाच स्पर्श झाल्याचा आरोप करत त्यांच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात ३५४ कलमांतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर आव्हडांनी आज (14 नोव्हेंबर) जयंत पाटील यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी जयंत पाटलांनी आव्हाडांनी राजीनामा दिल्याचे सांगितले. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे आव्हाडांचा राजीनामा देणार का?, याकडे आता लक्ष लागेल आहे.

जयंत पाटील म्हणाले, “जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा माझ्याकडे सुपूर्त केला आहे. आव्हाडांनी विधानसभा अध्यक्षांच्या नावाने त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. मी आव्हाडांना राजीनामा मागे घ्यावा, त्यांना राजीनामा देण्यापासून मी थांबवण्याचा प्रयत्न केला, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. परंतु, आव्हाडांनी त्यांचा राजीनामा माझ्याकडे दिला आहे. आता आमच्या सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे मी राजीनाम्याचे पत्र घेऊन जाणार आहे. मी शरद पवार यांच्याशी चर्चा करून त्यावर तेच निर्णय घेतली,” असे ते त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

नेमके काय आहे प्रकरण
कळवा खाडी पुलाचे रविवारी (13 नोव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी, खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थितीत होते. या कार्यक्रमादरम्यान आव्हाडांनी एका महिलेला चुकीचा स्पर्श केल्याचा दावा केला आहे. यानंतर ती 40 वर्षीय तक्रारदार महिलेने स्थानिक पोलिसात धाव घेतली. यानंतर महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली. या महिलेने केलेल्या तक्रारीवर आव्हाडांवर ३५४ कलमांतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. “मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे”, अशी घोषणा जितेंद्र आव्हाड  यांनी ट्वीट करत केली.

 

संबंधित बातम्या

 

“लोकप्रतिनिधींवर विनयभंगाचा गुन्हा लावणे ‘हा’ अतिशय भ्याड हल्ला”, अजित पवारांची संतापजनक प्रतिक्रिया

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BBC विरोधात विधानसभेत ठराव मंजूर; केंद्र पाठोपाठ राज्याचा दणका

Aprna

बच्चू कडू यांचा अपघात; पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत

Aprna

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे !

News Desk