मुंबई। “मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे”, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्वीट करत केली आहे. आव्हाडांच्या ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळजनक उडाली आहे. कळवा खाडी पुलाचे रविवारी (13 नोव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थितीत होते. यावेळी एका महिलेने आव्हाडांनी चुकाच स्पर्श झाल्याचा आरोप करत त्यांच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आव्हाडांवर पोलीसांनी ३५४ कलमांतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, ठाण्यातील विवियाना मॉलमधील थिएटरमध्ये रविवारी (7 नोव्हेंबर) रोजी रात्री आव्हाडांनी ‘ हर हर महादेव’ (Har Har Mahadev)या सिनेमाचा शो बंद केला होता. यावेळी आव्हाडांनी प्रेक्षकांना मारहाण करून बाहेर जाण्याचे आवाहन केले होता. या प्रकरणी आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आव्हाडांना अटक देखील झाली होती. यानंतर आव्हाडांना जामीनावर सुटका करण्यात आली. यानंतर अवघ्या दोन दिवसांत अव्हाडांवर दुसरा गुन्हा दाखल केला आहे. आता आव्हाडांवर ३५४ कलमांतर्गत विनयभंगाचा दाखल करण्यात आला आहे.
आव्हाडांनी ट्विटमध्ये नेमके काय म्हटले
पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही 😭३५४ ,.,
मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे,,. लोकशाहीची हत्या .. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 14, 2022
नेमके काय आहे प्रकरण