HW News Marathi
राजकारण

इतका खोटारडा पंतप्रधान जनतेने पाहिला नाही !

मुंबई । “शरद पवार काय बोलले याचा अभ्यास न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चुकीचा आणि खोटा प्रचार करत आहेत. ते किती खोटारडे आहेत हे आज सिद्ध झाले आहे”, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. नाशिक येथील सभेत पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांच्यावर टीका केली. याच पार्श्वभूमीवर नवाब मलिक बोलत होते.

“शरद पवार यांनी त्यांच्या भाषणात स्पष्ट सांगितले होते की, पाकिस्तानमधील राज्यकर्ते आणि सैन्यदल यांची भूमिका भारतविरोधी आहे. तर जनता तशी नाही. परंतु त्याचा खोटा प्रचार पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस करत आहेत”, असे नवाब मलिक म्हणाले.

“तुमच्याकडे संपुर्ण यंत्रणा आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा बोलले असतील तर आम्हाला दाखवा आम्ही राजकारण सोडून देऊ. मात्र, तसे नसेल तर पंतप्रधान मोदी यांनी देशातील जनतेची माफी मागावी”, अशी मागणी देखील नवाब मलिक यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू; भाजप आणि ‘मविआ’ची प्रतिष्ठा पणाला

Aprna

‘मोदी मुर्दाबाद’च्या घोषणा द्यायच्या नाहीत !

News Desk

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात मंगलप्रभात लोढांना स्थान; BMC निवडणुकीच्या दृष्टीने मोठे पाऊल

Aprna