HW News Marathi
राजकारण

कावळ्यांची चिंता करायची नाही तर मावळ्यांची चिंता करावी !

मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी ते भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र जे लोक खटल्यात आहेत त्यांच्यावर राज्यकर्ते दबाव आणत आहे त्यामुळे पक्षगळती होत आहे. आपण पूर्ण स्वच्छ आहात तर आपल्याला कसलीच चिंता नाही. ”कावळ्यांची चिंता करायची नाही तर मावळ्यांची चिंता करावी,” असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष सोडून जाणाऱ्या लगावला आहे.

राष्ट्रवादी महिला काँग्रेस कार्यकर्त्यांची आज (१८ ऑगस्ट) आढावा बैठकीत पवार बोलत होते. महिलांवरील अत्याचार व विकृत मनस्थितीवर जरब बसण्याची यंत्रणा ढिसाळ झाली आहे. राज्यकर्ते महिलांना सन्मानाने वागणूक देत नाहीत ते यंत्रणा काय चालवणार?, अशा शब्दात पवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. त्यावेळी पक्ष सोडून जाणाऱ्यावर बोलताना म्हटले की, “आज अनेक लोक पक्ष सोडत आहे. मात्र जे लोक खटल्यात आहेत त्यांच्यावर राज्यकर्ते दबाव आणत आहे त्यामुळे पक्षगळती होत आहे. आपण पूर्ण स्वच्छ आहात तर आपल्याला कसलीच चिंता नाही. ”कावळ्यांची चिंता करायची नाही तर मावळ्यांची चिंता करावी,”असा सल्ला त्यांनी आलेल्या महिला कार्यकर्त्यांना दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नाटकातील कुमारस्वामी सरकारच्या अग्निपरीक्षेला सुरुवात

News Desk

राज्यपालांची भेट घेऊन काँग्रेसचा सरकार स्थापन करण्याचा दावा

News Desk

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगरांचा प्राचार्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल

Aprna