HW News Marathi
राजकारण

…कि लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार ?, भाजपविरोधात राष्ट्रवादीची बॅनरबाजी

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या विरोधात बॅनरबाजी केली आहे. “ज्यांना आम्ही नाकारले, हाकलले त्यांनाच तुम्ही स्वीकारले, गोंजारले. आपला पाळणा हलणार ? कि लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार ? बुरा ना मानो होली है”, असा बोचरा सवाल राष्ट्रवादीने आपल्या बॅनर्सद्वारे केला आहे. माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी बुधवारी (२० मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आणखी काही देखील नेते भाजपच्या संपर्कात असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हटले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने भाजपवर बॅनर्समधून निशाणा साधला आहे.

रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या आधी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला होता. सुजय यांच्या भाजपप्रवेशापासूनच रणजितसिंह देखील भाजपच्या काही अंशी संपर्कात होते, अशीही माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर “आपला पाळणा हलणार कि लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार ?”, असा सवाल राष्ट्रवादीने भाजपला केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशद्रोही ठरवितात !

News Desk

काँग्रेसला मोठा दिलासा! कर्नाटक न्यायालयाकडून ‘या’ आदेशाला स्थगिती

Darrell Miranda

भीमा-कोरेगाव येथे ३० डिसेंबरला आझाद यांची जाहीर सभा

News Desk