HW News Marathi
राजकारण

महिला सबलीकरणाविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार पवारांनी गमावला !

मुंबई | राज्यसभेत बहुर्चित तिहेरी तलाक विधेयक मंगळवारी (३१ जुलै) मंजुर करण्यात आले. यावेळी सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि माजीद मेमन हे तिघेही गैरहजर होते. यावरून भाजपचे राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. काकडे म्हणाले की, “महिलांचा विकास, महिलांचे सबलीकरण याविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार काल (३० जुलै) खऱ्या अर्थाने शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने गमावले आहे.

तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत हे विधयक ९९ विरुद्ध ८४ मतांनी मंजूर झाले. आता हे विधेयक मंजुरीराठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे जाईल आणि त्यांच्या मंजुरीनंतर त्याचे कायद्यात रुपांतर होईल. हे विधयक राज्यसभेत मांडण्यापूर्वी काँग्रेस-भाजपकडून सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हिप जारी करण्यात आली होती. सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि माजीद मेमन हे तिघेही गैरहजर होते. यावरून काकडे यांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काय होतास तू काय झालास तू !, भाजपची बोचरी टीका

News Desk

बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत केला प्रवेश

Aprna

…तर आमचे स्वतंत्र अस्तित्व उरणारच नाही !

News Desk