HW News Marathi
राजकारण

पंतप्रधान मोदींच्या ‘या’ विधानामुळे पुन्हा उडाला नेटिझन्सचा गोंधळ

नवी दिल्ली | “ढगाळ वातावरणामुळे सर्जिकल स्ट्राईक नको म्हणणाऱ्या संरक्षण तज्ञांना मी सांगितले की ढगाळ वातावरणामुळे आपली विमाने रडारवर दिसणार नाहीत, आणि शत्रूला चुकवून परत येतील”, या वक्तव्यामुळे रविवारपासून (१२ मे) पंतप्रधान मोदींची खिल्ली उडविली जात होतीच. आता त्यात मोदींच्या आणखी एका विधानाची भर पडली आहे. “मी १९८७-८८ च्या दरम्यान पहिल्यांदा डिजिटल कॅमेरामध्ये फोटो काढला. त्यावेळी खूप कमी लोकांकडे ईमेल आयडी उपलब्ध होते”, असे विधान पंतप्रधान मोदींनी केले आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या या विधानानंतर नेटिझन्स मात्र पुन्हा भांबावले आहेत.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी हा दावा केला आहे. पंतप्रधान मोदींच्या या विधानानंतर काँग्रेसच्या आयटी विभागाच्या प्रमुख दिव्या स्पंदना यांनी ट्विट करून मोदींची खिल्ली उडविली आहे. “कोणी सांगू शकेल का की १९८८ मध्ये मोदी यांचा ईमेल आयडी काय असेल ? माझ्या मते dud@lol.com हा मोदींचा ईमेल आयडी असू शकेल”, असे म्हणत दिव्या स्पंदना यांनी पंतप्रधान मोदींची खिल्ली उडविली आहे. सोशल मीडियावर मोदींच्या या विधानाची जोरदार चर्चा होत आहे.

नेमके काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?

“मी पहिल्यांदा १९८७-८८ साली डिजिटल कॅमेराचा वापर केला. त्यावेळी खूपच कमी लोकांकडे ई-मेल आयडी उपलब्ध होते. माझ्या येथे विरमगाम तहसील येथे अडवाणी यांची रॅली होती. तेव्हा डिजिटल कॅमेराने मी त्यांचा फोटो काढला आणि तो फोटो दिल्लीला ट्रान्समिट केला” , असा दावा पंतप्रधान मोदींनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…राजकीय विरोधकांचे अपघात व घातपाताचे प्रमाण वाढले”, सामनातून टोला

Aprna

अवनीच्या हत्येची निष्पक्ष चौकशी व्हावी !

News Desk

कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा | आरपीआय

News Desk