HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

अनिल देशमुखांनी भाजपवर केलेल्या ‘त्या’ आरोपाचे गिरीश महाजनांनी केले खंडन

मुंबई | “अनिल देशमुख यांना कुठलाही प्रस्ताव दिलेला नव्हता. उलट विधानसभा निवडणुकीपूर्वी मला भाजपमध्ये घ्या, अशी विनंती केली होती”, असा गौप्यस्फोट ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केलेल्या आरोपाचे खंडन केले. अनिल देशमुख यांच्यावर  १०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला होता. यानंतर अनिल देशमुख यांना तुरुंगात जाण्याआधी भाजपकडून पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली होती. यावर गिरीश महाजन यांनी देशमुखांचे खंडन करत त्यांनाच भाजपमध्ये येण्याची विनंती केल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

 

गिरीश महाजन म्हणाले, “अनिल देशमुखांना कुठलाही प्रस्ताव दिलेला नव्हता. उलट अनिल देशमुख विधानसभा निवडणुकीपूर्वी मला भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली होती. आम्हाला किती विनवण्या केल्या होत्या, देशमुखांना दोन वेळा आम्हाला प्रस्ताव पाठवला होता. परंतु, ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले होते. आता त्यांची चौकशी सुरू असून आता ते जामीनावर सुटका झाली आहे. यामुळे देशमुखांनी निर्दोष असल्याचे पुरावे आणि कागदपत्रे ही ईडीला दाखवा”, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

 

देशमुखांनी भाजपवर नेमके काय आरोप केले

“माझ्याकडे भाजपने समझोत्याचा प्रस्ताव दिला होता. जर मी समझोता केला असता तर तुरुंगात गेलो नसतो. परंतु, त्यावेळी मी बाहेर पडलो असतो. तर महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षापूर्ण होण्याआधीच पडले असते. मला माझ्या साहेबांच्या नेतृत्त्वार विश्वास आहे. मी आयुष्यभर जेलमध्ये जाईन. परंतु, मी समझोचा”, असा खळबळजनक दावा देशमुखांनी केला होता. देशमुख हे मनी लाँड्रिंग प्रकरणात 13 महिने तुरुंगात होते आणि सध्या ते जामीनावर सुटले आहेत. या प्रकरणी देशमुखांना नोव्हेंबर 2021 मध्ये अटक झाली होती. यानंतर डिसेंबर 28 रोजी जामीनावर देशमुखांची सुटकेवर आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“जयंत पाटलांनी पावसात भाषण करण्यापेक्षा गावांचा पाण्याचा प्रश्न आधी मिटवावा”

News Desk

शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर 2 आठवड्यानंतर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

Aprna

अस्वस्थ ‘कॉर्पोरेट’ लॉबीने काँग्रेस पक्ष गांधीमुक्त करण्याचा विडा उचललाय !

News Desk