मुंबई | राज्यसभा उमेदवारांना मतदान करण्यात यावे, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीच्या न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. मलिकांच्या वकिलांमार्फत राष्ट्रवादीने ईडीच्या न्यायालयात अर्ज दाखल केले आहे. मलिक हे मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने 23 फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांच्या घरी छापे टाकला होता. यावेळी ईडीने मलिकांना ताब्यात घेतले होते. या अर्जावर न्यायालय 8 जून रोजी सुनावणी होणार आहे
याआधी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील राज्यसभेसाठी मतदान करता यावे, ईडीच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यानंतर मलिकांनी देखील राज्यसभेसाठी मतदान करता यावे म्हणून मागणी ईडीच्या न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. राज्यात राज्यसभेच्या 6 जागेसाठी 10 जून रोजी मतदान होणार आहे. आणि राज्यसभेसाठी महाराष्ट्रात 7 उमेदवार देण्यात आले आहे. त्यामुळे महाविकासआघाडी आणि भाजपसाठी राज्यसभेची निवडणूक ही प्रतिष्ठेची मानली जात आहे.
नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने 23 फेब्रुवारी महिन्यात अटक केली होती. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आतापर्यंत ईडीने मलिक यांच्या अनेक मालमत्ता जप्त केल्या आहेत. अटक झाल्यानंतर सुरुवातीला मलिक हे पोलीस कोठडीत होते. मात्र, त्यानंतर मलिकाना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर मलिकांची प्रकृती खालावत गेली. त्यामुळेच मलिकांनी जामीनासाठी अर्ज केला होता. किडनीच्या आजारामुळे मलिकांचा पायाला सूज येत असल्याचे या अर्जात सांगण्यात आले होते. यासह खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी परवानगी मिळावी असेही अर्जात म्हंटले आहे. अखेर न्यायालयाने त्यांना परवानगी दिली आहे.