HW News Marathi
राजकारण

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी होऊ शकतो राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार

पुणे | राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर २८ नोव्हेंबर रोजी शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन-दोन नेत्यांनी राज्याच्या मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मात्र, अद्याप या नेत्यांची मंत्रीपदे समोर आलेली नाही. त्याचप्रमाणे, राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार देखील रखडला आहे. याच पार्श्वभूमीवर, आता कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. “अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंत्रीमंडळ विस्तार होऊ शकतो”, अशी माहिती यावेळी छगन भुजबळ यांनी दिली आहे. येत्या १६ डिसेंबर रोजी होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मिळत आहे.

“राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबतचे सर्व अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आहेत. मात्र, विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो”, असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, राज्यातील या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सध्या संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. विधानसभेनंतर राज्यात निर्माण झालेल्या भाजप-शिवसेनेतील मोठ्या सत्तासंघर्षानंतर एक नवे समीकरण तयार होऊन राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले. मात्र, वेगवेगळ्या विचारधारा असलेले हे सरकार ५ वर्षे टिकू शकेल का ? अशी शंका वारंवार उपस्थित केली जात आहे. त्याचप्रमाणे, राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारास लागणार विलंब हा या तिन्ही पक्षांतील मतभेदांमुळे आहे का ? अशी शंका देखील उपस्थित होत होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महिला व बालविकास विभागाचा घेतला आढावा

Aprna

उदयनराजेंच्या भाजपप्रवेशानंतर आज प्रथमच शरद पवार साताऱ्यात

News Desk

खरा धक्का तर निकालाच्या दिवशी असतो

News Desk