HW News Marathi
राजकारण

रक्ताचा माणूस आपला राहू नये इतक्या खालच्या पातळीचे राजकारण होते !

बीड | बीड नगरपरिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या ४०० कोटी रुपयांच्या विविध योजना शुभारंभ व विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. “रक्ताचा माणूस आपला राहू नये इतक्या खालच्या पातळीचे राजकारण जिल्ह्यात होते. असे राजकारण संस्कृतीला शोभत नाही. कोणाच घर फोडण्याचे पातक आपल्यावर येऊ नये हा गोपीनाथ मुंडे यांचा विचार आम्ही सांभाळतो”, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

“बीड जिल्ह्यात घराघरात राजकारण करणे सुरु आहे. यामुळे रक्ताचा माणूस आपला राहत नाही. एवढ्या खालच्या पातळीचे राजकारण नसावे. आम्ही अस कधी करत नाही. कोणाचेही घर फोडण्याचे पातक आपल्यावर येऊ नये हा गोपीनाथ मुंडे यांचा विचार आम्ही जपला आहे. आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्यावर असा प्रसंग आला तेव्हा मी त्याच्याबरोबर राहिले. कारण मी घर फुटल्याचे दुःख भोगले आहे”, अशी भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुढचे २४ तास महत्त्वाचे आहेत, सतर्क आणि सावध राहा !

News Desk

गायरान जमीन प्रकरणी अब्दुल सत्तारांचा पदाचा दुरुपयोग; तात्काळ मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा! – अजित पवार

Aprna

राज ठाकरेंच्या भेटीसाठी बेस्टचे शिष्टमंडळ ‘कृष्णकुंज’वर

News Desk