HW News Marathi
राजकारण

छत्रपतींचा असा अपमान सहन केला जाणार नाही पवारांनी सरकारला खडसावले

मुंबई | अरबी समुद्रात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचीच उंची कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचा खळबळजनक प्रकार विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे सभागृहासमोर आणला.

या सरकारचं काय सुरु आहे ?सरकार असं का वागत आहे ? असा संतप्त सवाल विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी स्थगन प्रस्तावावर बोलताना सरकारला केला. सरकार छत्रपतींचे नाव घेवून सत्तेत आले त्या छत्रपतींच्या पुतळयाची उंची कमी होता कामा नये असा दम देतानाच असं तुम्ही केलात तर तुम्हाला काळ माफ करणार नाही आणि जनताही तुम्हाला माफ करणार नाही.

छत्रपती हे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यांचा असा अपमान सहन केला जाणार नाही असेही दादांनी सरकारला खडसावून सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विश्वासदर्शक ठराव सिद्ध करण्यासाठी पत्र पाठविले; उद्या ‘मविआ’ सरकार येणार धोक्यात?

Aprna

सनी देओल यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश, गुरुदासपूरमधून निवडणूक लढविण्याची शक्यता

News Desk

नरहरी झिरवळ यांच्याविरोधात दोन अपक्ष आमदारांनी आणला अविश्वासाचा प्रस्ताव

Aprna