HW News Marathi
राजकारण

‘२०२२ पर्यंत रस्ते विकासाचे चित्र पूर्णपणे बदलणार’

कल्याण | येत्या दहा वर्षात राज्यभरातील सर्व रस्त्याला एकही खड्डे नसणार, असे वक्तव्य सार्वजनिक कामगार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. तसेच २०२२ पर्यंत रस्ते विकासाचे चित्र पूर्णपणे बदलेल, असा दावा पाटील यांनी व्यक्त केला आहे. गावात मंत्री येणार ही माहिती मिळताच सर्व सरकारी कर्मचारी कामाला लागतात. रस्ते सुधारण्याची किंवा रस्ते बनवण्याची सूचना नसेल तरी रस्ते बनविले जातात असे धक्कादायक वक्तव्य सार्वजनिक कामगार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

तसेच कल्याण-पडघा रोडवरील बापसाई गावात सुरेश हावरे यांनी उभारलेल्या गृह प्रकल्पातील सदनिकाधारकांना पाटील यांच्या हस्ते चाव्या वाटप करण्यात आले. रस्ते विकसित केल्यावर तीन ते पाच वर्षात रस्ता खराब झाला अथवा रस्त्यावर खड्डे पडल्यास संबंधीत कंपयांकडून रस्ता दुरुस्ती देखभालीचे दायित्व दिले जाणार आहे व खड्डे बुजविण्याची जबाबदारी निश्चित केले जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य, आमदार आहुजा वादाच्या भौव-यात

News Desk

निवडणूक आयोग भाजपला मदत करत आहे का ?

News Desk

युतीसाठी भाजपकडून मनसेची मनधरणी ?

News Desk