HW News Marathi
राजकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर त्यांच्या अपयशाची कबुली दिली | अब्दुल्ला

मुंबई | लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहे. लोकसभेसोबतच देशातील चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची देखील घोषणा देखील करण्यात आली आहे. परंतु जम्मू-काश्मीरमध्ये मात्र सुरक्षेच्या कारणास्तव विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. आयोगाच्या या निर्णयामुळे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.

“आंतरराष्ट्रीय स्तरावर जम्मू-काश्मरीच्या विधानसभा निवडणुकीकडे लागेल असताना. मात्र मी कधीच विचार नव्हात केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर त्यांच्या अपयशाची कबुली दिली आहे,” असे ट्विट करत ओमर यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय सुरक्षा हाताळणीचे बालाकोट आणि उरी हे प्रतिक नसून जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती त्यांनी आणखीनच बिघडवली आहे. आता तर विधानसभा निवडणुका पुढे ढकलत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान, दहशतवादी आणि हुर्रियतसमोर शरणागती पत्करली असल्याचा आरोप ओमर यांनी ट्विटच्या मधून केला आहे. १९९६ पासून पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका वेळेत होणार नाहीत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधी हातात मशाल घेऊन महाराष्ट्रात दाखल; आज ‘भारत जोडो यात्रे’चा असा आहे प्रवास

Aprna

पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस

News Desk

तलवारीची धार कायम आहे व शिवसेनेची तलवार ‘म्यानबंद’ नाही !

News Desk