HW News Marathi
राजकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या संविधानाचे रक्षक आहेत !

मुंबई | “काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी असा आरोप केला कि पंतप्रधान मोदी संविधान उध्वस्त करतील. मात्र, हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधानाचे रक्षक आहेत. ते संविधानाला नव्हे तर काँग्रेसला उध्वस्त करतील”, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. संविधानाला कोणी उध्वस्त करू शकत नाही. जे संविधान उध्वस्त करण्याचा विचार करतील तेच या देशातून उध्वस्त होतील असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज दिला.

“देशातील लोकशाहीनेच नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी निवडून आणले आहत. तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत याच लोकशाहीच्या मदतीने ते देशातून काँग्रेसला देशातून उध्वस्त करतील”, असेही रामदास आठवले यावेळी म्हणाले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान हे जगात सर्वश्रेष्ठ आहे. हे संविधान कोणीही कधीही उध्वस्त करू शकत नाही. जो कोणी संविधान उध्वस्त करण्याचा प्रयत्न किंवा साधा विचार देखील करेल तो स्वतःच उध्वस्त होईल”, असेही रामदास आठवले यावेळी म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#IrrigationScam : चौकशीला सहकार्य करणार, माझा न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास !

News Desk

‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावावरून काँग्रेसमध्ये मतभेद ?

News Desk

एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळीच्या सुट्ट्या रद्द

Gauri Tilekar