HW News Marathi
राजकारण

पुलवामा हल्ल्यानंतरचे ४ तास पंतप्रधान फिरत होते, काँग्रेसचा आरोप

नवी दिल्ली | “संपूर्ण देश पुलवामा भीषण हल्ल्याच्या दुःखात बुडालेला असूनही पंतप्रधान मोदी त्या दिवशी संध्याकाळपर्यंत शुटींगमध्ये व्यस्त होते. जगातील कोणता पंतप्रधान असा वागतो ? पुलवामामध्ये दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी हल्ला झाला. मात्र, पंतप्रधान मोदी ६ वाजून १० मिनिटापर्यंत शुटींग करण्यात, स्वतःच्या नावाच्या जयघोषात व्यस्त होते”, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली आहे.

“जगातील कोणत्याच पंतप्रधानांनी अशी कृती केली नसेल. पुलवामा हल्ल्यानंतर चार तास पंतप्रधान फिरत होते. देशातील चुली बंद होत्या तेव्हा पंतप्रधान मोदी उत्तराखंडमधील गेस्ट हाऊसमध्ये नाश्ता करत होते. देश शोकात बुडाला असताना पंतप्रधान विदेश दौऱ्यावर गेले आहेत. अशा पंतप्रधानाबद्दल काही बोलायला माझ्याजवळ शब्दच नाहीत”, असे सुरजेवाला यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संघासाठी भारतातील १३० कोटी जनता हिंदूच !

News Desk

आ. महेंद्र दळवींच्या नेतृत्वात रायगड जिल्ह्यातील पेण मधील शिवसैनिक शिंदे गटात सामील

News Desk

निरंजन डावखरेंचा गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश

News Desk