HW News Marathi
राजकारण

चव्हाण ७०,००० कोटी खर्च केले…पाणी कुठे गायब झाले ?

कराड | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील प्रचार ऐन रंगात आला आहे. आता विधानसभेकरिता भाजप महाराष्ट्राच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सज्ज झाले आहेत. राज्यात अमित शाह एकूण १२ तर पंतप्रधान मोदी ९ सभा घेणार आहेत. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आज (१३ ऑक्टोबर) काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कराडमध्ये नुकतीच अमित शाह यांची सभा पार पडली. यावेळी “पृथ्वीराज चव्हाण ७०,००० करोड खर्च केलेत पाणी कुठे गायब झालं ?”, असा सवाल उपस्थित करत अमित शाह यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली आहे.

अमित शहांच्या कराडमधील भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

  • साताऱ्याच्या भूमित येऊन मी धन्य झालो.
  •  ही भुमी म्हणजे हिंदवी स्वराज्य स्थापना केलेल्या शिवाजी महाराजांची भूमी.
  •  भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांची पक्ष आहे , इथे अतुल भोसलेंसारखे छोटे छोटे कार्यकर्ते आहेत , इथे कोणताही वंश चालत नाही.
  •  मागच्या वेळी अतुलबाबा निवडणुक हरले होते , जर तुम्ही अतुल भोसलेंना जिंकवल तर त्यांना नेतां मी बनवणार
  •  जेव्हापासून पक्ष बनला आम्ही छत्रपतींच्या नावावर या पक्षात काम करतो
  •  जेव्हा उदयनराजे पक्षात येत आहेत हे कळालं तेव्हा मी देवेंद्रजींनी म्हटलं की त्यांना दिल्लीला घेऊन या मी माझ्या हाताने त्याचं स्वागत करणार
  •  काॅंग्रेस वाचल्यांने कधीच आपल्या नेत्यांचा सम्मान केला नाही
  •  पूरग्रस्त परिस्थितीचा सामना या जिल्ह्याने केला मात्र आचारसंहिता संपली आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले की हा प्रश्न मर्गी लावणार
  •  पृथ्वीराज चव्हाण ७०,००० कोटी खर्च केलेत पाणी कुठे गायब झालं ?
  •  कृष्णा महामंडळाचे काम आम्ही येत्या काळात पुर्ण करू, एकदा संधी द्या
  •  शरद पवार सांगा , महाराष्ट्रासाठी काय केल ?
  •  पृथ्वीराज चव्हाण केंद्रामध्ये होते , तुम्ही महाराष्ट्रासाठी काय आणतं ?
  •  मोदींचे ५ वर्ष आणि तुमचे ५० वर्ष , आमच्या विकासांच पारडं जडं आहे तुमच्यापेक्षा
  •  ६० दिवसांचा भागवत सप्ताह घेतला तरी आमच्या कामांची हिशोब द्यायला वेळ कमी पडेल
  •  महाराष्ट्राच्या मतांवर देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा अधिकार आहे
  •  महाराष्ट्र आणि कलम ३७० चा काय संबंध असा सवाल विचारतात
  •  काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे , आम्ही ते कलम हटवले आहे
  •  पृथ्वीराज चव्हाण जर मत मागायला आले तर त्यांना विचारा की कलम ३७० च्या विरोधात आहात की नाही
  • २०१४ पर्यंत देशांतील एका एका घुसपैठीला निवडुण निवणुन बाहेर काढणार
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महान लढवय्यास आमची नतमस्तक होऊन मानवंदना!

News Desk

राहुल कलाटे चिंचवड पोटनिवडणूक लढवणार; ‘मविआ’च्या प्रयत्नांना अपयश

Aprna

संजय राऊतांना AK47 ने उडविण्याची लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी

Aprna