HW News Marathi
राजकारण

९ तारखेला राज्यातील सरकार स्थापनेचा तिढा सुटेल !

जळगाव | जळगाव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीकांच्या नुकसानीमुळे संपूर्ण जिल्ह्यात गंभीर पीक परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. अशाप्रसंगी एका आठवड्याच्या जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे सरसकटपणे पंचनामे आत करून ते शासनाला तात्काळ सादर करावेत, असे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. महाजांनी शनिवारी (२ नोव्हेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयात पीक नुकसानीबाबत तातडीची आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.

“राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांनी धीर सोडू नये”, असे आवाहन देखील यावेळी गिरीश महाजन यांनी केले आहे. दरम्यान, गिरीश महाजन यांनी यावेळी बोलताना राज्यात सत्तास्थापनेवरून सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देखील भाष्य केले आहे. “सत्तास्थापनेसाठी ९ तारखेपर्यत वेळ आहे. तोपर्यंत सर्व प्रश्न सुटून परिस्थिती स्थिरस्थावर होईल”, अशी आशा गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. त्याचप्रमाणे आजही (३ नोव्हेंबर) गिरीश महाजन यांनी “सरकार स्थापनेचा तिढा ९ तारखेला होणा-या बैठकीत सुटेल”, असा दावा पत्रकारांशी बोलताना केला.

सध्या भाजपची ‘वेट अँड वाॅच’ची भूमिका !

“भाजपची फार काही न बोलता वेट अँड वाॅचची भूमिका आहे. तिथून संजय राऊत बोलत आहेत. त्यामुळे आम्ही सर्व सध्या त्यांचे ऐकतो आहोत”, असा टोला महाजनांनी लगावला. त्याचप्रमाणे, “मुख्यमंत्री भाजपचा होईल”, अशी पुष्टी देखील महाजन यांनी जोडली. त्याचप्रमाणे, जिल्ह्यात भाजपच्या २ जागा कमी झाल्याने त्याची जबाबदारी माझी असून आम्हाला बंडखोरांचा फटका बसल्याचे देखील महाजन यांनी यावेळी कबुल केले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“48 तासात प्रकरण पूर्ण संपले नाही तर…”, शरद पवारांचा इशारा

Aprna

रिपब्लिकन पक्षाला मिळणारे राज्यातील एक मंत्रिपद अविनाश महातेकर आणि भुपेश थुलकर यांना विभागून देणार

News Desk

भाजपाचा सभात्याग, कुमारस्वामींचे विधानसभेत बहुमत सिद्ध 

News Desk