HW News Marathi
राजकारण

पुलवामा हल्ला हा निवडणुकांसाठी मोदींनी केलेला पूर्वनियोजित कट !

नवी दिल्ली | पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरून मोदी सरकारवर विरोधकांकडून वारंवार होणाऱ्या टीकेने देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता मिझोराम राज्याचे माजी राज्यपाल आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते अजीज कुरेशी यांनी देखील या पार्श्वभूमीवर मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. “पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन घडवून आणलेला पूर्वनियोजित कट म्हणजे पुलवामा दहशतवादी हल्ला होय. जनता तुम्हाला ४२ जवानांची हत्या करुन त्याचेच राजकीय भांडवल करु देणार नाही”, असा गंभीर आरोप अजीज कुरैशी यांनी केला आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते बी.के.हरीप्रसाद यांनी देखील यापूर्वी मोदी सरकारवर असाच गंभीर आरोप केला होता. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील भीषण दहशतवादी हल्ला हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा कट असल्याचा खळबळजनक आरोप बी.के.हरीप्रसाद यांनी केला होता.

भारतीय हवाई दलाच्या १२ ‘मिराज २०००’ विमानांनी २६ फेब्रुवारी रोजी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर १००० किलोंचे बॉम्ब फेकले. यात जवळपास २५० ते ३०० दहशतवाद्यांच्या खात्मा करण्यात आल्याचे म्हटले जात असले तरीही अद्याप सरकारकडून याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. म्हणूनच गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून या एअर स्ट्राईकचे पुरावे मागितले जात आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कसब्यातील विजयानंतर रवींद्र धंगेकरांनी घेतली शरद पवारांची भेट

Aprna

गृह मंत्रालयाने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची एसपीजी सुरक्षा हटविली

News Desk

#MarathaReservation : मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

News Desk