HW News Marathi
राजकारण

काँग्रेसला कमी जागा जिंकण्यातही राहुल गांधींचीच मदत होणार !

कणकवली | “महाराष्ट्रात आणि हरियाणाची विधानसभा निवडणूक जवळ असताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी मात्र बँकॉकला फिरायला गेले होते. कारण, आपण महाराष्ट्रात येऊन कितीही, काहीही केलं तरी कोणताच फरक पडणार नाही हे राहुल गांधींना माहित होते”, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. तर, काँग्रेसला कमी जागा जिंकण्यातही राहुल गांधी यांचीच मदत होणार असल्याचा टोला देखील मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे. कणकवलीत भाजपाचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

“मला वाटले कि राहुल गांधी महाराष्ट्रात नाहीत तर हरियाणात असतील. पण नाही. मग वाटलं कि महाराष्ट्र, हरियाणात नाही तर दिल्लीला असतील पण तिथेही नव्हते. वायनाडमध्येही नव्हते. मग नि चौकशी केली तर मला समजले कि राहुल गांधी बँकॉकला गेले होते. शेवटी त्यांच्या नेत्यांना त्यांना फोन करुन अशी विनंती करावी लागली कि महाराष्ट्रात या”, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधी यांना टोला लगावला आहे. त्याचप्रमाणे, यंदाच्या विधानसभेत काँग्रेसला कमी जागा मिळण्यासाठीही राहुल गांधींचीच मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

“आम्हाला समोर विरोधक दिसतच नाही. आमचे पैलवान अंगाला तेल लावून तयार आहेत. परंतु, कुस्तीसाठी समोर कोणीही पैलवान दिसत नाही”, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला होता. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये मोठे शाब्दिक युद्ध रंगले होते. दरम्यान, विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसा राज्यातील वातावरण तापू लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेवटच्या क्षणी देवेंद्र फडणवीसांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

Aprna

…तर मग वाजपेयींनी महाभेसळीचे नेतृत्त्व केले काय ?

News Desk

“महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात कायदा सुव्यवस्थेसाठी केंद्रीय सुरक्षा दल पाठवा”, संजय राऊतांची मागणी

Aprna