HW News Marathi
राजकारण

राज ठाकरे यांनी कट-पेस्ट करुन लोकांची दिशाभूल करु नये !

मुंबई | “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कट-पेस्ट करुन लोकांची दिशाभूल करु नये. जे वास्तव आहे तेच मांडा आणि नसेल जमत तर असे बोलू नका”, अशी टीका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज (२३ एप्रिल) केली आहे. हरिसालचे वास्तव तेथील उपसरपंचांनी मांडल्यानंतर पत्रकारांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर विनोद तावडे यांनी ही टिका केली.

कॉंग्रेस नेत्यांच्या आश्रमशाळेत मुलींवर लैंगिक अत्याचार व लैंगिक शोषण होत असून याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाई विरुध्द काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोक पैसे मिळविण्यासाठी असले आरोप करतात, असे निर्लज्जपणे सांगितल्या प्रकरणी विनोद तावडे म्हणाले कि, “आता आपल्याला राज ठाकरे यांना प्रश्न विचारायचा आहे की मोदी, शहा नको असे तुम्ही आवाहन जर करत असाल तर अशा प्रकारच्या लोकांना निवडून देण्याचे आवाहन ते आपल्या जाहीर सभेत करणार आहेत का ?”

“१९७५ साली जेव्हा देशात आणीबाणी लागू झाली, तेव्हाच देशाच्या संविधानावर घाला घातला होता, त्यावेळी शरद पवार आपण त्याच पक्षात होतात हे बहुधा आपल्याला आठवत नसावे” असा टोलाही विनोद तावडे यांनी शरद पवार यांना विचारला आहे. “माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जो आदर्श घोटाळा केला त्यामुळे महाराष्ट्राची जी नाचक्की झाली ती नाचक्की कधीही पुसून काढता येणार नाही”, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तोपर्यंत विरोधी पक्षाने नाकावरचा ‘मास्क’ तोंडात बोळा म्हणून वापरावा !

News Desk

…अन्यथा २६ जानेवारीपासून अन्नत्याग आंदोलन करू, लिंगायत समाजाचा इशारा

News Desk

वैयक्तीक डेटा चोरीसाठी सरकारने आधार कार्ड केले सक्तीचे

News Desk