HW News Marathi
राजकारण

राज ठाकरे साधणार उत्तर भारतीयांशी संवाद

मुंबई | नेहमीच उत्तर भारतीयांच्या विरोधात उभे राहणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी (२ डिसेंबर) प्रथमच उत्तर भारतीयांच्या मंचावर जाणार आहेत. उत्तर भारतीयांच्या प्रश्‍नांना उत्तरे देत ते थेट संवाद साधणार असल्याने कांदिवलीत होणार्‍या या सवाल-जवाबाकडे सर्व मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

कांदिवलीतील युवा छात्र महापंचायत संमेलनाच्या निमित्ताने राज आणि उत्तर भारतीय असा हा सवाल-जवाब तथा संवादाचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रमत कांदिवली पश्चिम येथील भुराभाई हॉलमध्ये सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍यावर काय बोलणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पश्चिम उपनगरांतील मालाड, कांदिवली आणि बोरिवली या तिन्ही विभागामध्ये मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय वास्तव्याला आहेत. यामध्ये सर्वाधिक रिक्षाचालक, फेरिवाले स्थायिक आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर उत्तर भारतीय यांची मते मिळविण्यासाठी राज ठाकरे या कार्यक्रमता सहभागी होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

मुंबईतील मराठी-उत्तर भारतीय यांच्यामधील गैरसमज दूर करण्यासाठी या पंचायतीचे आयोजन केले आहे. उत्तर भारतीय नेते भडकावू भाषण करून जातात, परंतु त्यांचा फटका सामान्य उत्तर भारतीयांना बसतो. हे कुठेतरी थांबावे आणि खरी माहिती उत्तर भारतीय आणि मराठी माणसाला कळावी, या उद्दशाने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले जाते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीने महिला सबलीकरणाचा गौरव! – मुख्यमंत्री

Aprna

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात पोलिसांना यश

Chetan Kirdat

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे संसदेचे अधिवेशन लवकर गुंडाळणार

News Desk